Share

‘शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत’

Published On: 

मुंबई : कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २० वा दिवस आहे.आंदोलनावर तोडगा कधी निघणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने दिलेला लेखी प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला होता. सरकारने कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.

दरम्यान, यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य करत केंद्र सरकारची भूमिका व त्यावर शेतकरी नेत्यांनी दिलेला प्रतिसाद यावर भाष्य केलं आहे. “दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची आमची तयारी आहे. मात्र, या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

तसंच, या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. “केंद्र सरकार पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने चर्चेसाठी प्रस्ताव पाठवले. चर्चेद्वारे शंका दूर व्हाव्यात, तसेच कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी सरकारने दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत,” असं उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!