Share

शेतकऱ्यांनो काळजी नसावी, सरकार तुमच्या पाठीशी : कृषिमंत्री दादा भुसे

Published On: 

हिंगोली : देशात कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांवर लादली आणि लॉकडाऊन, ओला दुष्काळ, कीड यासारख्या संकटांना सामोरा जाणारा शेतकरी पुरता दबून गेला. कांद्याला सुगीचे दिवस आले असताना केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुरुवातीला लाखो टन कांदा सीमाभागात तर अडकलाच आणि देशासह राज्यातील कांद्याचा भाव देखील कोसळला.

तर, विदर्भासह मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतात पाणी साचल्यामुळं हाताशी आलेली पिकं कुजली आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आल्याने नदी लगतची शेतीच वाहून गेल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी हवाल दिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यातील स्थितीची पाहणी केली आहे. हिंगोलीमध्ये काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भुसे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु, नागेशवाडी या भागात पिक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनो काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे अस आवाहन देखील त्यांनी शेतकरी बांधवांना यावेळी केलं.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!