Share

शेतकरी भावांनो, धीर धरा आत्महत्या हा मार्ग नाही, लोणकारांची शेतकऱ्यांना भावनिक साद!

Published On: 

🕒 1 min read

जालना : शेतकरी भावांनो, धीर धरा आत्महत्या हा मार्ग नाही, अशी भावनिक साद माजी मंत्री आमदार बबनराव लोणकारांनी शेतकऱ्यांना घातली आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, रस्त्यावर, विधानभवनात वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. परतुर तालुक्यातील वाहेगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दत्ता मच्छिंद्र काटे यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी ते बोलत होते.

शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी लोणीकर यांनी यापूर्वीच केलेली आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी कोणत्याही प्रकारची अतिवृष्टीची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली नाही. परिणामी तालुक्यातील केवळ ३६ गावांचा समावेश अतिवृष्टीग्रस्त म्हणून करण्यात आला आहे. परिणामी अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झालेले असताना देखील कोणतीही मदत मिळणार नाही या भावनेतून दत्ता मच्छिंद्र काटे यांनी आत्महत्या केल्याचे लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दत्ता मच्छिंद्र काटे नामक अल्पभूधारक शेतकऱ्याने अतिवृष्टीचे पंचनामे न झाल्यामुळे झालेले नुकसान व शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही या भावनेतून आत्महत्या केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी लोणीकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!