Share

आखेर दिक्षाभूमी एक्सप्रेस लातुरमार्गे धावणार; शिवजयंतीपासून होणार सुरूवात

Published On: 

लातूर : दीक्षाभूमी एक्सप्रेस ही महाराष्ट्र आणि उत्तर भारताला जोडणारी महत्वाची रेल्वे आहे. अनेक दिवसापासुन ही रेल्वे लातूर मार्गे वळवावी अशी मागणी होत होती. या मागणीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आखेर या रेल्वे ला लातुरमार्गे धावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लातूरातील भाविकांची व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. येत्या शिवजंयतीपासून ही रेल्वे लातूर मार्गे धावायला सुरूवात होईल.

अनेक वर्षापासून सातारा, पुणे, अहमदनगर , औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडमार्गे धावत होती. या मार्गानुसार कोल्हापुर ते नागपुर हे अंतर ४०८ कि.मी लाबून जावे लागत होते. यामुळे प्रवासाला १२-१५ तासांचा अधिक वेळ लागत होता. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्ययही होत होता. तसेच लातूर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी एकही रेल्वे नव्हती. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर मंडळाचे सल्लागार समिती सदस्य श्यामसुदंर मानधना यांनी ही रेल्वे लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली.

तसेच औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिक्षाभूमी एक्सप्रेस लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना पत्राद्वारे केली होती. येत्या शिवजयंतीपासुन म्हणजे १९ फेब्रुवारी पासून ही रेल्वे लातूर पासून धावणार आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, परळी वैजनाथ, वाराणसी, बौद्ध विहार अशा अनेक तिर्थस्थळांना तसेच शहराना जाण्यासाठी सोय झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!