Share

शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करा; न्यायालयाची महत्वपूर्ण सूचना

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्लीला जाणारे काही महामार्ग रोखून धरले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखलं असून शेतकऱ्यांनी कडाक्याच्या थंडीतही तिथेच ठाण मांडला आहे. सरकारने त्यांना मोकळ्या मैदानावर हटवण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आपल्या लढ्यावर शेतकरी ठाम राहिले.

दरम्यान, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून शांततामय मार्गानं त्यावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं काल केली. या समितीमध्ये भारतीय किसान संघटना, केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा असं सरन्यायाधीश एस.ए . बोबडे आणि न्यायमूर्ती एस.बोपण्णा आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमणियन या तीन जणांच्या खंडपीठानं सांगितलं.

दिल्लीच्या सीमेवर असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकांवर झालेल्या सुनावणीवेळी ही सूचना समोर आली असून या याचिकांवरील सुनावणी आजही सुरू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!