उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे अराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीच्या तुळजापूरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची अनेक दिवसांची मागणी होती. या अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन शिवराज्याभिषेक दिनी संपन्न झाले. ही वास्तू स्वाभिमानाची साक्ष देईल असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय.
या संबंधी राणाजगजितसिंह म्हणाले की, ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला साजेसा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा होती. अनेक दिवसापासून यासाठी पाठपुरावाही करत होतो. अखेर यास यश मिळाले आहे. त्या सोबतच चौक सुशोभीकरणाचे कामही सुरू होईल. तुळजापूरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.’
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून या छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ पुतळ्यासाठीचे भूमिपूजन करण्यात आले. लवकरच काम पूर्ण होऊन इतिहासाची आणि स्वाभिमानाची साक्ष देणारी वास्तू उभी राहिल. असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केलाय. या बरोबरच सुशोभीकरणाचे कामही सोबतच केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझी वसुंधरा’ अभियानात वैजापूर नगरपरिषदेने मारली बाजी
- मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांच महत्वाचं विधान
- ‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’
- ‘पवारांनी आंदोलन केलं तर त्यांच्याही पाठी उभे राहू; संभाजीराजे तर आमचे राजे आहेत’
- ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

