Share

Bus accident in Indore । एकनाथ शिंदेंनी साधला मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

Published On: 

मुंबई : इंदोरहून पुण्याला येणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने अपघात झाला असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर जखमींना आवश्यक ती मदत करून, बचावकार्यात देखील मदत करावी, अशी विनंती त्यांनी धार जिल्हा प्रशासनाला केली आहे.

हा अपघात खलघाट येथील संजय सेतू येथे झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ. पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. या बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत घटनास्थळावरून १५ जणांना वाचवण्यात यश आले असल्याची माहिती मिळत आहे. तर बचाव कार्य अजूनही सुरूच असून मृत्यू झालेल्यांची संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान धार जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून जखमींना तात्काळ उपचार द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!