Share

Eknath Shinde | “संघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार एकत्र आलं, आता…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण

Published On: 

मुंबई : मुंबई मेट्रो तीनची चाचणी आज घेण्यात आली होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर टोलाः

संघर्ष नंतर शिंदे फडणवीस सरकार एकत्र आलं आहे. आता विकास थांबणार नाही. मेट्रो तीनचा पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी फायदाच होणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. मेट्रो तीनचा हा प्रकल्प साडे 30  किलोमीटरचा आहे. या भागात कनेक्टिव्हिटी नव्हती. 17 लाख प्रवासी यामधून ये जा करणार आहेत. साडे सहा लाख गाड्या आता रस्त्यावर धावणार नाहीत, लाखो लिटर इंधनाची बचत होणार आहे, पर्यावरण तसाच वेळ देखील वाचणार आहे, लोकलचा प्रवास करताना अतिशय त्रास होतो. मात्र हा 33 किलोमीटरचा प्रवास आरामदायी होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र पाच वर्षांच्या काळात प्रकल्पाने चांगली प्रगती केली असून मी देखील त्याच मंत्रिमंडळात सहभागी होतो. अनेकांनी त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे. त्यामुळे अडथळे दूर होतील, असा टोला एकनाथ शिंदेंनी यावेळी लगावला. वायू प्रदूषण दूर होईल, रस्त्यावरची वाहने कमी होतील, या निमित्ताने राजकीय प्रदूषण ही बंद झालं आहे.

दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे, असं शिंदे म्हणाले आहेत. प्रकल्पाच्या तिन्ही बाजूने झाडं असल्यामुळे लोकांच्या मताचा विचार करून न्यायालयाने देखील हिरवा झेंडा दाखवला असून सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचं एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!