🕒 1 min read
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना इडीने चौथ्यांदा समन्स बजावला आहे. १०० कोटींची वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या ईडीच्या रडारवर आहेत. सचिन वाझेन आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. त्यादिवशीपासून इडीने देशमुखांविरोधात तपास करण्यास सुरूवात केली. अनिल देशमुखांना तीन वेळा समन्स बजवाल्यानंतर ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना चौथ्यांदा समन्स बजावून २ जुलैरोजी हजर राहण्यास सांगितले होते. याबाबतीत देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी माहिती दिली.
त्यानंतर अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात चौकशीतून सूट मिळावी अशी याचिका केली. त्यावर ३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र २ ऑगस्टला त्यांना पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले. अशा प्रकारे सुनावणीच्या एक दिवस आधी समन्स बजावणे योग्य नसून त्याबाबत ईडीच्या हेतूबद्दल शंका निर्माण होते अशे विधान देशमुखांचे वकिल इंद्रपाल सिंग यांनी केले आहे.
दरम्यान माझी व्हिडिओ, ऑडिओद्वारे चौकशी करा, अशी मागणी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच मला ECIR ची प्रत द्या किंवा कमीतकमी माझ्याकडून हव्या असलेल्या कागदपत्रांची यादी द्या, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, असे पत्र त्यांनी वकिलांमार्फत ईडीला दिले आहे.आता ३ ऑगस्टला अंतरिम दिलासा मिळावा यासाठी केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान ईडीकडून आता चौथ्यांदा अनिल देशमुख यांना समन्स देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षणमहर्षी, मराठवाड्याचे साने गुरुजी सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक


