🕒 1 min read
नवी दिल्ली: विरोधी कार्यकर्त्यांना मारून सत्ता बळकावणे ही आमची संस्कृती नाही. आमची विचारधारा, आमच्या नेत्याची लोकप्रियता आणि सरकारचे कर्तृत्व या जोरावर सर्वत्र निवडणूक लढवून आम्हाला जिंकायचे आहे. कुटुंबाच्या जोरावर पक्ष चालवणाऱ्यांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah target on Congress) यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.
आम्ही पराभवाच्या भीतीने निवडणुका घेत नाही असे जे म्हणत आहेत, तेच घाबरले आहेत. घाबरणे हा आमचा स्वभाव नाही. विजयाचा एवढा आत्मविश्वास असेल, तर ६ महिन्यांनी निवडणुकीला कशाला घाबरता. नागरिकांचे लोकशाही हक्क हिरावून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी रातोरात देशावर लादलेल्या क्रूर आणीबाणीला भीती म्हणतात. अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.
निवडणुकीची भीती कशाला, हार-जीत चालूच राहते. लोकशाहीत जनतेचा निर्णय प्रत्येकाने मान्य केला पाहिजे. संसदेत आमचे दोनच सदस्य असतानाही आम्ही घाबरलो नव्हतो, आज 300 हून अधिक आहेत. ‘हम दो, हमारे दो’… या पक्षाला आज विरोधी पक्षाचा दर्जाही नाही. अशी खोचक टीकाही अमित शाह यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकी सर्व मुद्द्यांवर चर्चा होतेय”, अजित पवारांचा प्रसाद लाड यांना टोला
- कोरोनाची नियमावली आणखी शिथिल होणार; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?
- “…या प्रवृत्तीमुळे जनता तुम्हाला चपलेकडे देखील उभी करत नाही”, चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंना टोला
- IPL 2022: शेल्डन जॅक्सनची कॅच बघून रैनाला आठवला गिलक्रिस्ट ; VIDEO व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
