Share

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल झाले – राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई  – सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली…  लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागला असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.२६ मे रोजी केंद्रातील भाजप सरकारला ७ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

या देशात भाजपचे सरकार आहे मात्र ते मोदी सरकार म्हणून ओळखले जाते आहे. या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपचे लोक उत्सव साजरा करणार होते मात्र राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी उत्सव साजरा करु नका असा आदेश काढला आहे ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!