मुंबई : तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच महागाई, बेरोजगारी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर उपोषण करून मोदी सरकारचा धिक्कार केला. मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आदी नेत्यांनी या उपोषणात सहभाग घेतला होता.
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले.’
‘तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर अमाप कर वाढवून लूट चालवली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं सरकार असताना पेट्रोलवर १ रुपया रस्ते विकास कर होता तो मोदींनी तो १८ रुपये केला आणि त्यावर शेतकऱ्यांच्या नावाने लिटरमागे ४ रुपये सेस असे तब्बल २२ रुपये प्रति लिटरमागे लूट केली जात आहे. शेतक-यांच्या नावावर वसुल केल्या जात असलेल्या ४ रुपयांतून मोदी सरकार दरवर्षी ७६ हजार कोटी रुपये कमावते आणि जुलमी कायदे आणून शेतक-यांना देशोधडीलाही लावत आहे. केंद्रातील सरकार हे ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे,’ असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फक्त त्यांची दाढी वाढलीये आणि स्क्रू ढिला झालाय; ममता बॅनर्जींची जहरी टीका
- तिथीनुसार शिवजयंतीवर देखील राज्य सरकारने लादले निर्बंध, नियमावली जाहीर !
- महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण,कार्यालयांची तोडफोड; 54 जणांना अटक
- पुण्यात कोरोनाचा कहर : नवीन नियमावली जाहीर, वाचा काय राहणार सुरु काय होणार बंद !
- ‘लॉकडाऊन‘ मध्येही विद्यापीठाच्या परीक्षा होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

