🕒 1 min read
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. दिल्लीच्या सिमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हजारो वाहने रस्त्यावर उभी असल्याचे दिसून येत आहे.
केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत बंदला सुरुवात झाली असून या बंदला काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंद दरम्यान शेतकरी वेगवेगळ्या महामार्गावरील गाड्या तसेच रेल्वे लाईन अडविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील वाहतूक पोलिसांनी गाझीपूर सीमेवर वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. तसेच शेतकऱ्यांनी पंजाब-हरियाणा शंभू सीमा देखील बंद केली आहे. स. ६ ते दु. ४ वाजेपर्यंत शेतकरी रस्ते अडवून निषेध करणार आहेत.
Massive traffic snarl seen at Gurugram-Delhi border as vehicles entering the national capital are being checked by Delhi Police and paramilitary jawans, in wake of Bharat Bandh called by farmer organisations today. pic.twitter.com/dclgkqp3X1
— ANI (@ANI) September 27, 2021
याबाबत राकेश टिकैत म्हणतात, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी भारत बंद होणार आहे याची माहिती आधीच देण्यात आली होती. या भारत बंदच्या काळात सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ शकते याबाबत आम्ही आधीच सतर्क केले होते. ज्यांनी या माहितीकडे दुर्लक्ष केले त्यांना या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
SKM के आव्हान पर देशभर में भारत बंद को मिला अभूतपूर्व समर्थन,नागरिकों को हो रही परेशानी के लिए क्षमा चाहते हैं लेकिन किसान भी 10 महीने से झेल रहे हैं तमाम परेशानियां,किसानों द्वारा आक्समिक वाहनों को निकलवाने व यात्रियों हेतु पानी चाय दूध के बेहतर इंतजाम किए गए हैं।#BharathBandh
— Rakesh Tikait (@RakeshTikaitBKU) September 27, 2021
नागरिकांनी दुपारच्या जेवणानंतरच घराबाहेर पडावे असे आम्ही नागरिकांना अवाहन केले होते. मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेऊ, यासाठी दहा वर्ष लागली तरी चालतील, असे राकेश टिकैत म्हणाले.
मराठी बातम्या
- आनंदराव अडसूळ यांना ज्या प्रकरणात ईडीने समन्स पाठवलं ते प्रकरण नेमकं आहे तरी काय ?
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
