नांदेड: सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील (OBC Political Reservation) अंतरिम अहवाल फेटाळण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आता ओबीसी आरक्षणाच्या जागा आता राखीव खुल्या करुन निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
या मुद्द्यावरून आता महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. भाजपच्या नेत्यानी टीका केलीच आहे मात्र त्याच सोबत आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात अहवाल मांडला. तसेच यात भाजप देखील दोषी आहे. इम्पेरीकल डेटा सहज मिळाला असता, मात्र तो दिला नाही, अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
कृषी विभागाकडून हरभऱ्याची उत्पादकता जाहीर, शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार योग्य हमीभाव
Crime Suspense आणि Bold Scenesचे कॉकटेल; ‘हे’ पाच चित्रपट आणि वेबसीरिझ तुम्ही पाहिले का?
राहणे आणि पुजाराबद्दल रोहित शर्माचे मोठे वक्तव्य! म्हणाला, भविष्यात….
युद्ध थांबण्याची शक्यता लांबणीवर; रशियाशी चर्चेला युक्रेनने दिला नकार..
‘KGF’ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार केजीएफ 2


