🕒 1 min read
लातूर : सध्या शेतकऱ्यांसाठी तूर आणि हरभरा खरेदीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. सरकार बाजारपेठेतील दर घसरले तरी नाफेडच्या माद्यमातून धान्य खरेदी करत असते. हरभरा उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाले आहेत. कारण कृषी विभागाने द्वितीय आगावू अंदाज जाहीर केला आहे.
हरभऱ्याचे उत्पादन वाढले तरी आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा आधार घेता येणार आहे. हा लाभ घेण्याआधी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील ६ लाख ८९ हजार टन हरभऱ्याची खरेदी खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. असे धोरण स्पष्ट केले आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्र उभारले जाणार आहेत.
खरेदी केंद्रावरील दर –
५ हजार २३० असा दर खरेदी केंद्रावर ठरवून दिला आहे. तसेच दुसरीकडे खुल्या बाजारात ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये दर आहे. त्यामुळे नाफेडच्या वतीने निवडण्यात आलेला खरेदी केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
