🕒 1 min read
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज म्हणजेच 27 जुलैला 60 वा वाढदिवस आहे. दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला. यावर ते उत्तर देताना म्हणाले कि, ‘ मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केले आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजींच्या रूपाने राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम,समर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभले आहे. अशी कौतुकाची थाप देत मुख्यमंत्री ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली आहे.
तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितंच जिंकेल. पुरोगामी,प्रगत विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील,जगातील अव्वल राज्य बनण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंवर दाखवत अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोल्हापूर सांगलीमध्ये अलमट्टी धरणामुळे पूर नाही, तर…’ ; अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
