मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखाना तसेच निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारला. मुंबईतील नरिमन पॉईंटच्या कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाली. अजित पवार आणि त्यांच्या 3 बहिणीच्या कारखान्यांवर सकाळपासून छापेमारीची कारवाई सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. यात पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील बहिणींचा समावेश आहे.दरम्यान, सत्ताधारी नेहमीप्रमाणे भाजपकडून सूडबुद्धीने राजकारण सुरु असल्याचा आरोप करताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपनेते हे या कारवाईचे समर्थन करताना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. अजित पवार, पार्थ पवार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी हा 6 महिन्यांच्या संशोधनाचा परिणाम आहे, शेतक-यांवर शरद पवार बोलले त्यानमुसार ही कारवाई असे बोलणे हास्यास्पद आहे. असे त्यांनी म्हटले आहे. कर नाही त्याला डर का, जे तपासातून समोर येईल त्याला उत्तर द्या त्याचबरोबर अनिल देशमुखांसारखे फरार होऊ नका, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा आत्मसमर्पण कधी करणार? समोर आली मोठी माहिती…
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

