🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पाच राज्यांच्या निवडणूक निकाला संदर्भात भाष्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते हुकूम मानतात का?, असा सवालही केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘राजेश्वर सिंह हे ईडीचे जॉइंट डायरेक्टर तडकाफडकी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतात आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लखनौमधून निवडून येतात. पदावर असताना याच अधिकाऱ्याने ऑगस्टा वेस्टलॅण्डपासून टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा, एअरसेल-मॅक्सिस प्रकरणापर्यंत अनेक घोटाळय़ांचा तपास केला आहे व या घोटाळ्यावरून भाजपने काँग्रेससह इतर विरोधकांवर शिंतोडे उडवले आहेत. म्हणजे ‘ईडी’सारख्या संवेदनशील सरकारी सेवेत असताना हे अधिकारी सत्ताधारी पक्षाचे हुकूम मानतात काय? असा प्रश्न निर्माण होतो.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सुशिक्षितांनी राजकारणात यायलाच हवे. यापूर्वी अनेक बडे नोकरशहा राजकारणात येऊन उच्चपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपात जाऊन कोणी निवडणुका लढवल्या हा गुन्हा नाही. प्रश्न इतकाच आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांत एकपक्षीय राजकारण घुसले आहे. तपास यंत्रणांतील लोकांचा राजकीय प्यादी म्हणून वापर होऊ लागला तर देशातील न्यायव्यवस्था, प्रशासन हे दोन प्रमुख स्तंभच कोसळून जातील. लोकशाहीचे हे दोन प्रमुख स्तंभ राजकीय प्यादी किंवा हस्तक म्हणून वापरले जाऊ लागले तर निवडणुका लढविण्यात काहीच अर्थ राहणार नाही’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL: ‘तो दुर्दैवी ठरतोय’ विराटच्या ढासळत्या फॉर्मवर ; माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
- देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात- संजय राऊत
- “…तर भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा दावा
- हिंदू मतांचे ध्रुवीकरण करायला ओवेसींची योजना करण्यात आली- संजय राऊत
- “देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, त्यांना खुजं करु नका”, संजय राऊतांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
