Share

कोरोना काळात मनाने कोणतेही उपचार घेऊ नका

Published On: 

औरंगाबाद :कोरोनाचा कहर ग्रामीण भागातही वाढत आहे. मागील वर्षी शहरातच बाधितांचे प्रमाण जास्त होते, पण यावेळी मात्र अगदी खेडोपाडी रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. म्हणूनच साधा सर्दी, खोकला आणि ताप अशी तिन्ही लक्षणे असतील तर अशा लोकांनी मनाने कुठलेही उपचार न घेता त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी, अशा सूचना आवर्जून दिल्या जात असल्याचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या १६०८ झाली आहे. त्यापैकी ५८१ रुग्ण औरंगाबाद ग्रामीणमध्ये आहेत. खुलताबादमध्ये ५४, गंगापूर २१६, सिल्लोड ८५, पैठण ९९, वैजापूर २८८ तर सोयगावमध्ये १० रुग्ण आढळून आले आहेत. यावर खबरदारी म्हणून मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असे वारंवार सांगितले जात आहे.

संख्या १६०८ झाली आहे. त्यापैकी ५८१ रुग्ण औरंगाबाद ग्रामीणमध्ये आहेत. खुलताबादमध्ये ५४, गंगापूर २१६, सिल्लोड ८५, पैठण ९९, वैजापूर २८८ तर सोयगावमध्ये १० रुग्ण आढळून आले आहेत. यावर खबरदारी म्हणून मास्क लावणे, हात धुणे, अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करा, असे वारंवार सांगितले जात आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही लसीकरणाबाबत अजूनही अनेकांच्या मनात शंका आहे. त्यामुळेच यावर संवादाद्वारे समुपदेशन केले जात आहे. तसेच ग्रामीण भागातही लसीकरण वाढवण्यासाठी जनजागृती केली जात असल्याचेही संतोष कवडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!