बीड: माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातल्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येणार होता. पण सामाजिक कार्यकर्त्या यांनी वेळीच हा बालविवाह थांबवला. धारुर तालुक्यातील कारी या गावातल्या एका मुलासोबत गुरुवार (दि. १८) रोजी त्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जाणार होता. माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व दिंद्रुड पोलिस तिथे आल्याचे पाहताच वऱ्हाडी मंडळी पळून गेल्याने हा बालविवाह थांबवण्यात यश आले.
हिवरा गावातील १६ वर्षीय मुलीचा विवाह कारी येथील मुला सोबत गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. लग्नासाठी लागणारी सर्व तयारी सुरु होती. हळदीचा मांडव तसेच विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य व तयारी पुर्ण करण्यासाठी दोन्ही परिवरातील मंडळी कामाला लागले होते. मात्र माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल व दिंद्रुड पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश विदाटे विवाह स्थळावर पोहोचले.
पोलिसांना तिथे पाहताच तिथे वऱ्हाड्यांची चांगलीच धांदल उडाली आणि तेथून लगेच काहींनी पळ काढला. तिथे पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा, हा विवाह समारंभ नसून साखरपुडा कार्यक्रम असल्याचा बनाव मुलीच्या घरच्यांनी केला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रकार उघडकीस आला आणि वऱ्हाडी मंडळीने काढता पाय घेत विवाहसोहळा रद्द केला.
नियमानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ तर मुलाचे वय २१ पूर्ण असणे गरजेचे आहे. शासन तसेच संस्थांकडून याची जनजागृती होत असते पण तरीही ग्रामीण भागात अजूनही बालविवाह लावण्यात येत आहेत. आरोग्य मंत्रालयाने केलेल्या कुटुंब सर्वेक्षणात बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. हे बालविवाह थांबवण्यासाठी अजून जनजागृती करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- ‘आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला, तो अभुतपूर्व आहे’ बुमराह पाठोपाठ संजनानेही मानले आभार !
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
