🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. महसूल व कृषी विभागास झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, काल शुक्रवारीच पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली होती.
बीड जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. याचा फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून बीड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिट आणि मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. आज शुक्रवारीही अनेक ठिकाणी पाऊस झाला. अवकाळी पावसाने सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामुळे बहरलेल्या आंब्याचा मोहर उद्धवस्त झाला. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे त्याचप्रमाणे ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले हे पीक अक्षरशः भूईसपाट झाले.
https://www.facebook.com/DPMunde/posts/2930367310526213
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यामुळे हिरावून नेला आहे. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महसूल व कृषी विभागास झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- ‘रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?’
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
