मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेलेवेतून उतरवण्यात आले.
विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या सर्व प्रकारावर आता भाजप प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा होऊ नये याकरिता जिल्हाबंदीची नोटीस देणे ही लोकशाहीची क्रुर थट्टा असून संवैधानिक मुल्ये पायदळी तुडविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया मेश्राम यांनी दिली आहे.
एरवी संविधान बचावासाठी उर बडवणा-या आणि संविधानाचे दाखले देणा-या पुरोगामी म्हणविणा -या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांचा भ्रष्टाचार बाहेर निघून त्याची लक्तरे वेशीवर टांगली जावू नये यासाठी ही दडपशाही चालवलेली असून महाराष्ट्रातील सुजाण व जागरूक जनता फार काळ हे सहन करणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

