🕒 1 min read
मावळ : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मावळ तालुक्यातील इंदोरी गावात बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत एकूण २३१ बैलगाडयांनी सहभाग घेतला होता. यावेळी फडणवीसांचे जंगी स्वागत झाले. तसेच फडणवीसांनी शर्यत पाहण्याचा आनंद देखील लुटला. त्याचबरोबर महाविकास आघाडीला चिमटे देखील काढले.
दरम्यान फडणवीस शेतकऱ्याचा मित्र असणाऱ्या बैलांचे आभार मानत म्हणाले कि, “बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणाऱ्यांनी एकदा मावळात येऊन पाहावे. भाजपच सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र हे पुन्हा कोर्टात गेले आणि शर्यतीवर बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे, असे म्हणून कागदपत्रे कोर्टात देत ही बंदी उठवली”
“मी ठरवलं की नंबर 1 येतोच. महाविकास आघाडीचे नेते मात्र तीन मार्कशीट जूळवून पहिले आले. जनतेने आम्हाला 2014 आणि 2019ला देखील पहिलं आणलं होत. पण काहींनी शाळा केली. मात्र मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला, तो कधीच मागे हटत नाही”, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष रित्या आव्हानच दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
