मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी.बी.आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल देशमुख यांनी राजीनामा दिला.
दरम्यान,देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधक आणखी आक्रमक झाले आहे. भाजपने टीकेची झोड उठवली आहे तर सरकारच्या मंत्र्यांना या घटनेमुळे उत्तरे देता देता नाकी नऊ आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आज मुंबई हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं. मी सरकारशी संबंधित व्यक्त नाही आणि न्यायालयाशी निगडीत निर्णयावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या भूमिकेवरुन भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत हे स्वत:च्या मर्जीनुसार शिवसेनेचे प्रवक्तेपद मिरवतात. त्यांना वाटतं तेव्हाच ते प्रसारमाध्यमांना उत्तरं देतात, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एका बॉलमध्ये चार विकेट काढणार आहेत. लवकरच आणखी काही चेहरे समोर येतील, असा इशारा देखील प्रसाद लाड यांनी दिला आहे. सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- ‘सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याचा प्रयत्न राहील
- लातूर अर्बन बँकेचे ‘अच्छे दिन’, १७ कोटी २८ लाखांचा नफा
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- जिल्हा बँकेत बोर्डीकर गटाची बहुमताअभावीच रिंगणातून माघार,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

