🕒 1 min read
उस्मानाबाद : ओबीसी राजकीय आरक्षण रद्धची ठिणगी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार काळात पडली. ओबीसीच्या आरक्षणाला कोण विरोध करतय, यात्रा कोणी काढल्या हे देशाला माहिती आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावं. असे वक्तव्य सक्षणा सलगर यांनी केलं आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीवर विश्वास देखील व्यक्त केला.
केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारणे सर्वाच्च न्यायालयात वेळ मागुण घेतला. आगामी निवडणुकीपुर्वी मध्यप्रदेशप्रमाणे न्यायालय न्याय देईल व ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होतील असा विश्वास राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या –


