मुंबई : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूप जास्त गढूळ झालं आहे. त्यात महाराष्ट्रात येणारा वेदांत प्रकल्पही गुजरातला गेल्यामुळे, विरोधी पक्षनेते सत्तधारी पक्षनेत्यांवर आरोप, टीका करताना दिसून येतं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य –
आमच्या सरकारच्या काळात आम्ही अनेक योजना सुरू केल्या आणि निर्णय घेतले गेल्याने 2013 मध्ये परकीय गुंतवणुकीत पाचव्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. मात्र गेल्या दोन वर्षांत राज्याने पहिला क्रमांक गमावला आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर गेलं, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. काल लघुउद्योग भारतीच्या प्रदेश आधिवेशनात फडणवीस बोलत होते.
महाराष्ट्र राज्य गुजरातच्या पुढे जाईल –
गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही, लहान भाऊच आहे. आपल्यात निकोप स्पर्धा असून महाराष्ट्र गुजरातलाच नव्हे, तर कर्नाटकलाही मागे टाकणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्र राज्य गुजरातच्या पुढे जाऊन देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल.
तसेच कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि वाढवण बंदर हे दोन्ही प्रकल्प राज्य सरकार मार्गी लावणार असून त्याद्वारे राज्य दहा वर्षे पुढे जाईल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात”
- Eknath Shinde | मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – एकनाथ शिंदे
- Girish Mahajan | “ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता”
- Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…
- Gulabrao Patil | “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचे का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

