मुंबई : काल शिवसेनेच्या वतीने नेस्को सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले की, हिंमत असेल तर एका महिन्यामध्ये निवडणूका घ्या. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केली, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संंवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आमच्या पाठीत खंजीर खुपसला-
आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्यावेळी त्यांनी का राजीनामा देऊन परत निवडणूक घेतली नाही? असा खोचक सवालही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना केला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, 2019ला महाविकास आघाडी सरकारने मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेव्हाही मला ते संपवू शकले नाहीत आणि आता पुढेही संपवू शकणार नाहीत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, तुमच्यात जर हिंमत होती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत जावून निवडणूक लढवायची होती. मग जिंकून यायचं होतं. उद्धव ठाकरेंचं कालंच भाषण हे पूर्णपणे निराशेचं भाषण होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Sandeep Deshpande | “आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला
- Atul Bhatkhalkar | उद्धव ठाकरे शिवजयंती विसरले अन् अतुल भातखळकर म्हणाले…
- BYD ATTO 3 Launch Date | ‘या’ दिवशी लॉंच होणार BYD ATTO 3 इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या!
- keshav upadhye | “पेंग्विन सेनाप्रमुखांना गिधाड आणि गरूड यांच्यातला फरक कळत नाहीय”
- Jayant Dubale | कौतुक करावं तितकं कमी! नागपूरच्या जयंत दुबळेने इंग्लंड येथील नॉर्थ चॅनेल पोहून केला नवा विक्रम


