Share

Devendra Fadnavis | “महात्मा गांधींचे पत्र तुम्ही वाचले का?” ; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार!

Published On: 

Devendra Fadnavis | मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत वीर सावरकर यांच्यावर टीका केली. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले होते. ‘मै आपका नौकर रहना चाहता हु’, असे सावरकरांनी लिहिले होते, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देखील टोला लगावला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावरकरांचे पत्र बघायचे असेल तर त्यांनीही बघावे, असे राहुल गांधी म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुलजी, काल तुम्ही मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितल्या. आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो. आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का? त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही मला वाचायला सांगितल्या होत्या. भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी (तुमच्या आजी) स्वातंत्र्यवीर सावरकरजींबद्दल स्वातंत्र्य चळवळीचे आधारस्तंभ आणि भारताचे सदैव स्मरणीय सुपुत्र असल्याचे म्हटल्या होत्या.

“आता प्रश्न असा पडतो की, वीर सावरकरांबद्दल वारंवार विधाने करून तुम्ही फक्त तुमच्या व्होट बँकेची काळजी करत आहात का?. त्याचप्रमाणे देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहे. अशा निवडक गोष्टी वाचत राहिल्यास. त्यामुळे देश तुम्हाला अनेक पिढ्या हा प्रश्न विचारत राहील. अरे भाऊ, तुला काय म्हणायचे आहे?”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!