🕒 1 min read
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. ही समिती सध्या शंभर कोटी वसूली प्रकरणी चौकशी करत आहे. या चौकशीतून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी खरंच शंभर कोटी वसूली करण्यासाठी सांगितले होते का, या प्रश्नावर आता पोलिस उपायुक्त राजू भुजबळ (Raju Bhujbal) यांनी उत्तर दिले आहे. चांदिवाल समितीसमोर पोलिस उपायुक्त भुजबळ यांची उलटतपासणी झाली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. भुजबळ म्हणाले, १ मार्च ते १० मार्च २०२१ मध्ये मी विधानसभा बंदोबस्ताला असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, ४ मार्चला नियमित बैठक ज्ञानेश्वरीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत होती. या भेटीवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील सोबत असताना संजीव पलांडे हे मला भेटले. त्यावेळी पैशांसंदर्भात कुणासोबत आणि कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यावेळी गृहमंत्रीही बंगल्यावर नव्हते. मुंबईतील १ हजार ७५० बार मधून वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. मुळात त्यावेळी कोरोना संकटामुळे ३००-३५० बार पैकी १७०-१७५ बार सुरू होते. यातून कुठलीही वसुली करण्यात आलेली नाही. ही बाब मी माझ्या प्रतिज्ञापत्रातही आहे. आम्ही देशमुखांना भेटायला गेलो त्यावेळी पलांडे यांनी आम्हाला कुठलेही वसुली संदर्भातील टार्गेट दिले नव्हते, असा खुलासा भुजबाळांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कोरोनामुक्त होताच रोहित पवार मैदानात; साधला भाजपवर निशाणा
- ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’चे सुनिल मेहता यांचे निधन
- “आपल्याला कोरोना झाला नाही कारण…”; इंदुरीकर महाराजांचे अजब विधान
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बेकायदेशीर नियुक्ती; पाटील यांना धमकीचे फोन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
