🕒 1 min read
सातारा : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे कोकणासह सांगली, कोल्हापूर, सातारा यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. तर लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
३-४ दिवस कोसळणाऱ्या पावसाने उसंत घेतल्यानंतर पूर स्थिती ओसरू लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते देखील दौरे करून झालेल्या नुकसानीचा आढावा व समस्या जाणून घेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांनी आज साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्त गावऱ्यांची भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसळून 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गावातील नागरिकांची येथील शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे. फडणवीस यांनी मोरगिरी गावातील शाळेत असणाऱ्या दरडग्रस्त लोकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आंबेघर दुर्घटनेनंतर तिथल्या लोकांना या हायस्कूलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी गावकऱ्यांसोबतच एकत्र बसून जेवण देखील केलं. जे जेवण पूरग्रस्तांसाठी देण्यात येतं, त्यातीलच जेवण फडणवीस आणि दरेकर यांनी स्वत:ही खाल्लं. दरम्यान, गावकऱ्यांसह दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांशी या दोन्ही नेत्यांना चर्चा केली.
यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, ‘हे नुकसान मोठं आहे. सर्वांचं पुनर्वसन होणे गरजेचं आहे. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. नव्याने घर बांधून त्यांना जागा द्यावी लागेल. त्यांना त्यांची पसंती पाहून जागा द्यावी लागेल. अशा घटनांच्या वेळी मिळणारी मदत तोकडीच असते. पण त्यांना वाढीव मदत मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरती नाही तर शक्य ती मदत परमनंट करावी लागेल.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगॅससमधून होणारी हेरगिरी म्हणजे देशद्रोहच’; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- राज्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असताना ‘या’ जिल्ह्याने वाढवली चिंता
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- धोनीचा शिलेदार पुणेकर ऋतुराज आज करु शकतो आंतरराष्ट्रीय पदार्पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
