बीड :बीडच्या गेवराई तालु्क्यात राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला आहे. 22 पैकी 15 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने हे यश प्राप्त केले आहे. दरम्यान, भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेवराई तालुक्यात शुक्रवारी 21 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया पार पडली. तर अगोदरच गंगावाडी ग्रामपंचायत बिनविरोध होऊन राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या 21 पैकी 15 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावला आहे. यात तालुक्यात मोठी मानली जाणारी तलवाडा ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. तर उर्वरित सहा पैकी 4 ग्रामपंचातीवर भाजप आणि दोन ठिकाणी शिवसेनेने यश मिळविले आहे.
विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्त्वाखाली झालेला हा विजय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 2019 च्या निवडणुकीत विजयसिंह हे भाजपच्या लक्ष्मण पवारांकडून पराभूत झाले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी मतदारांशी आपला संपर्क कायम राखत गाठीभेटी सुरूच ठेवल्या. त्याचाच परिणाम म्हणून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला दमदार यश मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात महिला राज
- पृथ्वीराज चव्हाण यांना जोरदार धक्का ; भाजपने दिला धोबीपछाड
- बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला…
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
