🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले असून मंगळवारी (दि.२) एकाच दिवशी ३२५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ५० हजार ९१६ वर जाऊन पोहोचला आहे. आज (दि.३) शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. घाटी रुग्णालयात कोरोनाचे आज चार मृत्यू झाले तर काल दोन मृत्यू झाले. असे एकूणच जिल्ह्यातील सहा रुग्णांचा दोन दिवसात घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या मध्ये परभणीतील हदगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, पुंडलिक नगर येथील ८८ वर्षीय पुरुष, एन-४ सिडको येथील ८० वर्षीय पुरुष, तर सिल्लोड औरंगाबाद मधील ७७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. शहरात काल १०२ तर ग्रामीण भागात २६ अशा एकूण १२८ जणांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ४७२५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या एकूण २३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार : देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
- ‘उणे 30 डिग्री तापमानात चिन्यांना मागे धाडणाऱ्या सैनिकांचा उद्धव ठाकरेंनी अपमान केलाय’
- औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून बागडेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘शक्ती कायदा हा कदाचित मुख्यमंत्र्यांनाच समजला नसेल’- नूतन जैस्वाल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ करतात आणि फक्त ‘त्यांचेच’ ऐकतात – नाना पटोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
