लातूर: जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निलंगा, औराद श. व कासार शिरसी कृषि मंडळामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक पेरणी व पीक परिस्थितीची पाहणी करून कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयाबीन पीक पेरणीमध्ये बि.बि.एफचा वापर, पट्टा पद्धत व टोकण पद्धतीने लागवड तसेच रुंद सरी वरंभा वर सोयाबीन व तूर पिकांची लागवड या बाबीचा अवलंब करण्याच्या सक्त सूचना दिल्या.
निलंगा तालुक्यातील त्यांच्या दौऱ्यात बळीराजा शेतकरी गट यांची विकेल ते पिकेल अंतर्गत बोरसुरी डाळ याचे वितरण व विपणन, बोरसुरी ग्रामपंचायतीमधील जमीन सुपीकता निर्देशांक याचे वाचन कृषि सहायकामार्फत शेतक-यांना समजावून सांगीतले. मौजे चिंचोली स. येथील शेतकरी काशिनाथ मेहेत्रे यांची कांदाचाळ पाहणी केली. मौजे निलंगा येथील शेतकरी गोविंद शिंगाडे यांचे २० हेक्टर क्षेत्रावरील रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणी केलेल्या क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी उपस्थित तिन्ही मंडळ कृषि अधिकारी यांना मार्गदर्शन केले. भीमराव वैजनाथ पाटील यांनी पारंपारिक पाच फणी पेरणी यंत्राचा वापर करून मधला फण बंद करून सदरील बंद फणाच्या ठिकाणी नंतर सरी पाडण्याच्या तंत्राबदल कमी खर्चात केलेल्या पेरणी विषयी माहिती घेतली. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड केलेले शेतकरी यांच्यासोबत चर्चा केली. शेतकरी पटेल महताब यांनी स्वतः केलेले बहुपयोगी पावर टिलर खची करून त्याचे कौतुक यावेळी करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- मनाप्रमाणेच वसुंधरेलाही समृद्ध करावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे औरंगाबादकरांना आवाहन!
- महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण कोरोनामुक्त तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- पोटच्या मुलांनी नाकारले, अखेर ‘त्या’ आजींना समाजसेवकांनी दिला खांदा!
- विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश
- शहराबरोबरच औरंगाबाद ग्रामीणमध्येही व्यापऱ्यांचा लसीकरणाला प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

