Share

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीला दोन आठवडे उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच!

Published On: 

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदाही पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक हिरावून घेतले आहे. सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा हंगा-म नुकसानीचाच ठरत आहे. यावर्षी ६ लाख ६३ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामची पेरणी झाली आहे. यात कापूस ३ लाख ६१ हजार, मका १ लाख ७२ हजार, सोयाबीन २८ हजार तर तुरीचे ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जून, जुलैमधील कमी पावसातही पिक सुस्थितीत होते. परंतु, खरीप संकटात सापडले आहेत. दोन उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे झाले असून गंगापूर, सिल्लोड हे दोन तालुके अजूनही ५० टक्क्यांच्या आतच आहेत.

ऑगस्टच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने व सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीनंतर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, परंतु दोन आठवडे उलटूनही केवळ ६५.२८ टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत.

यात गंगापूर तालुक्यात सर्वांत कमी केवळ २८.५४ टक्के, वैजापूरमध्ये ५४.८० टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच महसूल राज्यमंत्र्यांच्या सिल्लोड युवक तालुक्यात केवळ ३४.९७ आणि यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या पैठण तालुक्यात ६९.७८ टक्केच पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान पंचनाम्यांनाच उशीर होत असल्याने मदत मिळणार तरी केव्हा, असा सवाल बाधित शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!