अमरावती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिलांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेत. सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र, अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही, अशी भूमिका घेतली. सरकार वीज कंपन्यांना पाठिशी घालत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय होता. यामुळे राज ठाकरेंवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. “वीज बिलाच्या मुद्द्यावर अदानी यांना भेटल्यानंतर त्यांनी वीज बिलावरुन यू टर्न घेतला, या गोष्टीत नाकाएवढंही तथ्य नाही. काही लोक बोलत असताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की त्यातून बातम्या होतात” अशी टीका राज ठाकरेंचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
अमरावतीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. “वास्तविक पाहता पवार साहेबांचा या राज्याशी ६० वर्षांपासून संबंध आहे. त्यामुळे पवार साहेब असं कधीच करू शकत नाहीत. केवळ बातम्या होण्यासाठी काही जण शरद पवारांवर टीका करतात” असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- तुम्ही बंद खोलीत काय केलं आम्हाला काय माहीत?, जितेंद्र आव्हाडांचा अमित शहांना टोला
- मार्चपूर्वीच निदेशकांना रखडलेल्या नियुक्त्या मिळणार : राज्यमंत्री बच्चू कडू
- माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार – रामदास आठवले
- बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर – संजय राऊत
- सिल्लोड शहरातील शेकडो कुत्र्यांना त्वचारोग, उपाययोजनांची गरज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

