Share

“तिघाडी सरकारच्या घोटाळेबाजांवर…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर केशव उपाध्ये यांची टीका

Published On: 

मुंबई : काल (६ मे) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देशात ज्या प्रकारची राजवट सुरु आहे. त्यावरून वाटते की, देशात इंग्रजांची राजवट सुरु आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली असून ते म्हणाले आहेत की,‘सध्याच्या परिस्थिती पेक्षा इंग्रजांची राजवट बरी होती, अशी मुक्ताफळे राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते सामनावीर संजय राऊत यांनी उधळलीत. सध्या आपण काय बोलतोय आणि काय करतोय. याचं भान त्यांना राहत नाही आहे. ब्रिटिशांची राजवट बरी म्हणून अपरोक्षपणे राऊतांनी देशाचा स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे.’

http://https://m.facebook.com/story.php?story_fbid=2079980585508945&id=234379736735715&sfnsn=wiwspwa

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘सद्यस्थितीत शिवसेनेच्या आणि तिघाडी सरकारच्या घोटाळेबाजांवर कारवाई होत असल्याने राऊतांना सध्याच्या केंद्र सरकारबाबत आकस असणे साहजिकच आहे. बाकी राऊतांच्या पक्षाच्या सरकारचे आदर्श इंग्रजच असावेत, असे त्यांच्या एकंदरीत वर्तणुकीवरून दिसतेय. अन्यथा केवळ हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला म्हणून एका पती-पत्नीविरोधात ब्रिटिशांनी दमनासाठी तयार केलेल्या राजद्रोहाच्या कलमाचा वापर केला नसता’, असेही उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!