Share

“भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला”, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

Published On: 

मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचे कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही’, असे राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!