🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील ‘ब्लॅक फंगस’च्या वाढत्या उद्रेकामुळे काँग्रेसने केंद्राला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदी सरकारच्या कुशासनाला जबाबदार धरले आहे, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ब्लॅक फंगसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.
‘ब्लॅक फंगसवर उपचार करण्यासाठी ‘एम्फोटेरिसिन-बी’ औषध महत्त्वाचे आहे. पण, बाजारात या औषधीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय, हा आजार सरकारच्या ‘आयुष्मान भारत’सह अनेक आरोग्य विम्यांत मोडत नाही. त्यामुळे केंद्राने ‘म्युकरमायकोसिस’च्या (ब्लॅक फंगस) रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आहे’, असे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे मोदी सरकारच्या कुशासनामुळे देशात कोरोनासह ब्लॅक फंगसची महामारी उद्भवल्याचा आरोप केला आहे. ‘मोदी सिस्टमच्या कुशासनामुळेच केवळ भारतात कोरोनासह ब्लॅक फंगसच्या महामारीचा उद्रेक झाला आहे. लसींचा तुटवडा आहेच. पण, आता या नव्या महामारीच्या औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान टाळ्या व थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘एम्फोटेरिसिन-बी’च्या उत्पादनासाठी केंद्राने ५ नव्या कंपन्यांना परवाने दिल्याची घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाविरोधी लढा दुबळा करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न’, प्रकाश जावडेकरांची टीका
- गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस
- लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवालांचे मोदींना चार सल्ले
- वंचित लोक, अनाथ बालकांसाठी सुविधा मजबूत करा; केंद्राचे राज्यांना निर्देश
- पदोन्नतीतील आरक्षण नाकारणारा निर्णय रद्द करा-प्रा. जोगेंद्र कवाडे


