मुंबई:- आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यावरून ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार धक्का दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहे. मुंबई मेट्रो-3च्या कांजूरमार्गमधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर आता भाजपाकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु हायकोर्टाकडून जनभावनेची अवहेलना झाली असे मत संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रोची कारशेड बनवण्यात येऊ नये अशी सामान्य नागरिकांची भावना होती. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गपेक्षा चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही. पण कांजूर येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या कामांना स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने जनभावनेची अवहेलना केली आहे. योजना तयार करणे आणि त्यांची अमलबजावणी करणे हे न्यायालयाचे नव्हे, तर सरकारचे काम आहे, असे ट्विट करत काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई के सामान्य नागरिक चाहते थे कि मेट्रो कार शेड #आरे में नहीं बनना चाहिए।
इसके लिए कांजुर मार्ग से बेहतर विकल्प कोई नहीं है।
हाई कोर्ट ने कांजुर में प्रस्तावित मेट्रो कार शेड पर रोक लगा कर जनभावनाओं की अवहेलना की है।
योजनाएँ बनाना और लागू करना सरकार का काम है, अदालतों का नहीं।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 16, 2020
महत्वाच्या बातम्या
- काय आहे आज ट्वीटरवरील ‘९३,००० पाकिस्तानी’ हॅशटॅग ट्रेंडींग मागील कारण ?
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- ‘या सरकारला अजून अक्कल येत नाही आणि येईल अशी खात्री सुद्धा नाही’
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- दिल्लीच्या सीमेवरुन आंदोलकांना हटविण्याच्या याचिकेवर आज होणार सुनावणी


