नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत तर या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
दरम्यान,शेतकऱ्यांच्या निषेधामुळे होणाऱ्या अडचणींविरोधात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांचे खंडपीठ या याचिकांवर सुनावणी घेईल. आंदोलनामुळे रस्ते रोखले जात आहेत, असे सांगत कायदा विद्यार्थी रिषभ शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत दिल्लीच्या हद्दीतून शेतकऱ्यांना हटविण्याची मागणी केली आहे.आणखी एका याचिकेत म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील कच्छ येथील कार्यक्रमात शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. शेतकऱ्यांच्या मागे राहून विरोधक सरकारवर हल्ला करत असल्याचे मोदी म्हणाले. कृषी क्षेत्रातील या सुधारणा सत्तेत असताना त्या पक्षांनाही करायच्या होत्या मात्र, त्यांना सत्तेत असताना हे जमले नाही. भाजपने सुधारणा करून दाखविल्या, असे मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता
- प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभागृहात घोषणा
- धक्कादायक ! सांडपाण्यात कोरोनाचा शिरकाव आयसीएमआरचा अहवाल
- अशोक चव्हाणांसारखा निष्क्रिय माणूस आजपर्यंत पाहिला नाही- विनायक मेटे
- ‘हा’ मातब्बर नेता करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

