चंद्रपूर: राज्यात कोरोनाच्या (Corona) रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत असल्याने राज्यसरकारने आवश्यक ते पावले उचलत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र सरकारने लागू केलेल्या या नियमांना काही लोकांकडून विरोध होत आहे. विशेष म्हणजे सरकारमधील काही नेत्यांकडून देखील याचा विरोध केला जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे एकमेव खासदाराने राज्यसरकारवर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Congress MP Balu Dhanorkar) यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारला घरचा आहेर दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अपयशी ठरले आहेत. लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का, असा सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दोन वर्षांच्या कालखंडात राज्य आणि केंद्र सरकारने कुठल्याच निश्चित उपाययोजना केल्या नाहीत, असे बाळू धानोरकर म्हणाले आहेत.
शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरदेखील बाळू धानोरकर यांनी टीका केली. तसेच राज्यातील सर्व पर्यटन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मागणी केल्यामुळे धानोरकर चर्चेत आले होते. आता कोरोनाच्या नियमांवरून सरकारवर जोरदार टीका केल्याने आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!
- ‘…हे तर बडतर्फ करण्यापेक्षाही भयानक’; १२ आमदारांच्या निलंबनावर राम कदमांची प्रतिक्रिया
- विठ्ठल भक्तीत रंगलेल्या अमिताभ बच्चनच्या “त्या” ट्विटने वेधले लक्ष ; खा. सुप्रियानीं ही केली कमेंट
- “पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही,” संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

