हिंगोली: येथील बसस्थानकाचे अपुरे काम झालेले असतानाही उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे बसस्थानक बंद करून राहिलेले काम पुर्ण करून पुन्हा उद्घाटन करावे यासह इतर मागण्यासंदर्भात हिंगोलीत प्रहार जनशक्ती पक्षाने गुरुवारी ३० सप्टेंबररोजी सकाळी अकरा वाजता बसस्थानकावर डफडे बजाओ आंदोलन केले.
दरम्यान हिंगोली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकाचे अपुरे काम झालेले असतांनाही उद्घाटन करून जनतेची दिशाभुल केली असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे.
तसेच या संपुर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार, इंजिनिअर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर करण्यात यावी, अशी मागणीही प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. दरम्यान या आंदोलनात प्रहार जनशक्तीचे युवा जिल्हाप्रमुख रॉबर्ट बांगर, जिल्हा संघटक प्रेम चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांची परिवहन विभागीय अभियंता सरोदे यांनी भेट घेऊन यावेळी विविध विषयांवर चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

