परभणी : परभणीच्या जिल्हाधिकारी पदावरुन झालेले राजकारण आता क्षमले असे म्हणता येईल. राजकीय दबाव झुगारत परभणीकरांनी दाखवलेल्या एकजूटीमुळे अखेर जिल्हाधिकारी पदावर आंचल गोलय रुजू झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांनी विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्या रुपाने मागास असलेल्या परभणी जिल्ह्याला चांगला सक्षम अधिकारी मिळाला आहे.
२०१४ मध्ये आयएएस झाल्यानंतर आंचल गोलय यांना महाराष्ट्र कॅडेर मिळाले होते. त्या नंतर त्यांनी २०१५ – १६ मध्ये विदर्भातील अकोला जिल्ह्यात त्यांचा परिविक्षाधिन कार्यकाळ पूर्ण केला. तसेच केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नॅचरल गॅस विभागामध्ये त्यांनी सहायक सचिव म्हणूनही काम केले. त्यांना पहिली नियुक्ती नोव्हेंबर २०१६ पासून पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून मिळाली. मे २०१८ पासून त्यांनी रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्या सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्यरत होत्या. आंचल गोयल यांचा जन्म पंजाब राज्यात झाला आहे. त्यांनी चंदीगड मधून बीई ईलेक्टॉनिक्स पदवी मिळविली आहे. २०१३ मध्ये त्यांची आयकर विभागात निवड झाली होती. आई वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल २०१४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकारने ‘तो’ प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी एकमुखाने त्याला पाठिंबा द्यावा; चंद्रकांत पाटलांचे आवाहन
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
- निलेश, नितेश राणेंसारखी मुलं कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नयेत; भास्कर जाधवांची जहरी टीका
- ‘सत्ताधारी असो वा विरोधक, संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदाराचे दोन वर्षांसाठी निलंबन करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
