Share

कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ

Published On: 

शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केली. कर्जमाफीसाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आता २००९ नंतरच्या थकित कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी शासनानं २०१२ नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाच या योजनेत समावेश केला होता. याशिवाय, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!