औरंगाबाद : वॉर्ड क्रमांक ५३ रोशन गेट येथील बारी कॉलनीत गत दिड वर्षांपासून दूषित पाण्याची समस्या आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच मात्र वापरायोग्य देखील नाही. या दूषित पाण्याला येणाऱ्या दुर्गंधीमुळे हे पाणी साठवले जाऊ शकत नाही. तसेच यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेने दहा दिवसात येथील पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त आस्किककुमार पांडेय यांना नागरीकांच्या वतीने देण्यात आला.
बारी कॉलनीत गेल्या दीड वर्षांत असून दूषित पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पोटाचे विकार होत आहेत. त्याचप्रमाणे दूषित पाण्याबरोबरच अनियमित होणारा पाणीपुरवठा हा एक मोठा चिंतेचा विषय आहे. या ठिकाणी दहा ते अकरा दिवसांआड पाणी येते. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. येथील नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहता पाणी विकत घेऊन गुजराण करणे त्यांना शक्य नाही. या पार्श्वभूमीवर रोशन गेट परिसरातील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी भारत मुक्ती मोर्चा द्वारे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांना निवेदन देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- गाझियाबाद प्रकरणाविषयी ट्विट करत जावेद अख्तरांनी व्यक्त केला संताप
- खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई
- रासायनिक खते आणि सोयाबीन बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा; रयत क्रांती संघटेनची मागणी !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- अभिनेत्रीने घरात भूत राहत असल्याचा सांगितला भयावह अनुभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

