Share

“संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा काल(२४ जाने.)भाजप नेत्यांनी जोरदार समाचार घेतला होता. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’शिवसेना चौथ्या नंबरवर गेली हे महत्त्वाचं नाही तर सेनेनं जागा जिंकल्या हे महत्त्वाचं असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत. संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे डोक्यावर परिणाम झालाय..गिरे तो भी टांगे उपर… अशी काहीशी त्यांची अवस्था झालीय’, असे वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राम जन्मभूमी आंदोलनामध्ये फक्त भाजपचा सहभाग होता शिवसेनेचा नव्हता, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, ‘कोणी काहीही म्हटलं तरी इतिहास आहे, दस्ताऐवज आहे. साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना त्यामध्ये गुन्हेगार केलं होतं. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्याला कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. त्या काळातला सामना पाहिला तर कारसेवकांची यादी आम्ही दिली आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!