मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी काल एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले. यावेळी त्यांनी तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का? असा सवाल करत टोला लगावला आहे.
“सत्ता मिळवा पण ती लोकशाही मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचे राजकारण नासवले जात आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला मी पुन्हा येईन असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का यावर ते म्हणाले की, “ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. त्यामुळे कुणीच कुणाला बांधिल नसतं.”
महत्वाच्या बातम्या:
- मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे आजपासून आमरण उपोषणाला बसणार
- भारतीय संघ पाकिस्तान असलेल्या ‘या’ विक्रमी यादीत सामील होणार
- “…तर तुम्ही कपाळ करंटे”, मुख्यमंत्री ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
- राष्ट्रवादी नेत्याकडून अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख; भाजपचा इशारा
- IPL 2022: आयपीएलचे संघ दोन गटात वाटले जाणार ; वाचा कोणता संघ कोणत्या गटात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

