पुणे : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातल्या मराठवाड्यासह विदर्भात मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या खरीप पिकाचे नुकसान झाले असून जीवित आणि वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यावरुन आता विरोधी पक्षाने सरकारवर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते, अतिवृष्टी होऊन एवढे दिवस उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. आता घोषणा पुरे झाल्या तातडीने मदत करावी. असे दरेकर म्हणाले.
आमची मागणी आहे, तत्काळ दुष्काळ जाहीर करावा. वडेट्टीवारांनी सांगितले होते की दोन दिवसांत मदत करु अद्याप मदत मिळाली नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. अशा वेळी मंत्र्यांचा जल्लोशात सत्कार करणे योग्य नाही. काही झाले की केंद्रावर ढकलायचे हे नेहमीचेच आहे. केंद्राने आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे. सत्तेत गेल्यावर शिवसेनेची भूमिका बदलली आहे. आधी विमा कंपन्यांची कार्यालय फोडणारी सेना आता कुठे गेली? असा प्रश्न उपस्थित करत आता आक्रमक होण्याची गरज आहे असेही दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

