🕒 1 min read
नागपूर : थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी अशी मागणी सर्वसामन्यांकडून केली जात आहे. तरी देखील महावितरण विभाग तोट्यामध्ये असल्याचे सांगून अनेकांची वीज सरकारकडून तोडण्यात येत आहे.
परंतु दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचे आरोप भाजपने केले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. अतिशय एशो-आरामाचा माहोल त्या ठिकाणी बंगल्यामध्ये करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
यावरून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर दुरुस्तीच्या नावाखाली करण्यात आलेल्या खर्चावर टीका केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी नितीन राऊत यांचा खरपूस संचार घेतला आहे. मंत्र्यांनी बंगले आणि कार्यालयांवर केलेला खर्च योग्य नाही. त्यांनी कार्पोरेट ऑफिस तयार केले. सुमारे 100 ते 150 कोटी रुपये बंगल्यांवर खर्च करण्यात आले. हा खर्च अनाठायी होता. शेतकऱ्यांना सरकार पैसे देत नाही. वीज बिल माफ करत नाही. कोरोनाचं संकट आहे आणि मंत्री बंगल्यांवर खर्च करत आहेत. हे काय चाललंय? ही मोगलशाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पहा चंद्रशेखर बावनकुळे यांची संपूर्ण पत्रकार परिषद
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/424842185282089
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बसमध्ये ८१ प्रवासी; जिंतूर येथील एस.टी. आगारात कोरोना नियम धाब्यावर
- यांच्यावर कारवाई होणार का? कोरोना तपासणी करणारे कर्मचारीच मास्कविना
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, मध्यप्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय…
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
