🕒 1 min read
मुंबई : आज(३ जाने.)पत्रकार परिषद घेत भाजपा नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार तसेच ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bujbal) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलत असतांना बावनकुळे म्हणाले की,’एकीकडे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात शब्द देतं, की तीन महिन्यात आम्ही डेटा देतो आणि दुसरीकडे समता परिषदेला पुढे करून, ते आपले कपडे वाचवण्याचं काम करत आहे. छगन भुजबळ समता परिषदेच्या नावाने राजकारण करताय, नौटंकी करत आहेत, या वयात त्यांना हे शोभत नाही’, असे खळबळजनक वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीत वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पुढे बावनकुळे म्हणाले की,’राज्य सरकारने तीन महिन्यांच्या आत आपले वचन पूर्ण करावे आणि निवडणूक आयोगाने मात्र ज्या निवडणुका लागल्याच नाहीत. त्या निवडणुका ओबीसींविना घेऊ नयेत.’ तसेच धनदांडग्या लोकांना गरीब ओबीसींच्या हक्काच्या जागा मिळवून देण्याचे नियोजन या सरकारने जाणीवपूर्वक केले आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
